Skip to main content

Posts

Showing posts from April, 2009

शोध मनाचा...

मन का?... अगाध कोडं आहे मन कधीही न उलगडणारं... असुनही प्रत्येकाकडे कधीही न सापडणारं.. मन असं मन तसं असच मानत रहायचं... पण नक्की मन कुणासारखं, असत कुठं लपलेलं... हे गुढ सतत उलगडत बसायचं... मनाचा गुंता मनानेच सोडवायचा त्याच गुंत्यात मनाला गुंतवायचं... मनाच्या शोधात मनाशीच भांडायचं मनावरच उगा रुसुन बसायच... भाडलं काय नि रुसलं काय? मन थोडीच कळलयं कुणाला.... नाही सापडणार शोधुन हे थोडीच वळलयं कुणाला... तरिही घेतोच आपण शोध मनाचा....कधीही न संपणारा....

आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

दुःख मनातलं....मनातच ठेवणं... त्यावर सुखाच....पांघरुण घालणं... असच गं सखे....आपलं झुरणं... आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....| भरारी घेताना...दिशा शोधणं... अडखळलो तरी...क्षितिज गाठणं... असच गं सखे...सारं जुळवणं... आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....| दुःखावर सखे....सुख गोंदणं... आकाशी इवल्या...पसरावं चांदणं .... हाच विचार...सतत जगणं... आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

प्रकाश..

प्रकाशाची भिती का गं सखे मनी दिशेची शाश्वती प्रकाशात...! अंधारात असे गुढतेची साथ सोड उगा यत्न गुंतण्याचा...! अंधारात साथ फ़क्त एकांताची नसे सावालीही सोबतीला...! प्रकाश किरणे ओढुन घे सखे दिशा गं प्रत्येक सापडेल...! धडपडण्याची असे सदा भिती निराधार वाटे अंधारात...! उजेडात जरी नसला साथी आधार असतो प्रकाशाचा...!

आत्मविश्वाचे थवे...

कोंडलेल्या भावनांना तु वाट नवी दे.. अंधारमय आयुष्याला आशेची पहाट नवी दे... स्वतःच्या हाताने तु नशीब घडव. हातावरच्या रेषा आता धेयाच्या दिशेने वळव... मुक्त मुक्त श्वासातुन गा तु गीत नवे ... तुझ्या स्वरातुन सदा येवो आत्मविश्वाचे थवे...

सोनेरी स्पर्श

तुझ्या मिठित येता विसरते माझे भान जसे पावसात भिजते चिंब-चिंब पान पान... तुझ्या रंगात रंगता सांग सावरावे कसे स्पर्श तुझा होता भाव आवरती कसे...? अणु-रेणु या तनाचा स्पर्शाने शहारला... तुझा सोनेरी स्पर्श रोमारोमात भिनला..

खुळं..

आठवांच्या झुल्यांवर हिंदोळा घेतो आपणही खुळे प्रेमात या होतो...! चंद्र-तार्‍यांना शब्दात उतरवतो जागुन त्यांच्यासोबत कविता रचतो...! आपल्याच विश्वात खुळ्यागत रमतो प्रेमालाही आपण खुळं बनवतो..!

बोल ना..!

तुझ्या आसवांत सये शब्द वाहु का गं देते गीत मनात दाटवुनी अशी भाव लपवते..! माझ्या शब्दातं गं तु्ला जशी ऊब मिळे प्रेमाची तशी मलाही हवी राणी उबदार कुस तुझ्या शब्दांची...! येऊ दे ना गं सये बहार तुझ्या शब्दांचा नको राहूस अबोल आता तरी बोल ना..! आता तरी बोल ना..!

"इंतजार"

माझ्या मनाची आता हीच गत आहे... तुला आठवण म्हणजे माझ्यासाठी व्रत आहे... सारखं मन वाहवत जात तुझ्या आठवांच्या देशी.. कितीही थांबवावं म्हटलं तरी थांबत नाही मजपाशी.... आता हा विरह हा नकोसा झालाय मलाही... भेटण्यासाठीचा "इंतजार" करवत नाहीये ना तुलाही??? माझ्या मनाचा रस्ता अरे, कधीच तुझ्या दिलाच्या दिशेने वळलायं.. मलाही आता, तुझा "इंतजार" चांगलाच कळलायं...

स्वप्न..

आपल्या स्वप्नांना वाट मिळालीच नाही..... विरहाच्या या रातीची पहाट कधी झालीच नाही.... आजही लाटच आहे मी... फ़रक इतकाच..... पुर्वी येऊन भेटायचे तुला... अन आता किनाराच वेगळा लाभलाय मला.... पण अजुनही तुच आठवतोस... कुठतरी खोलवर वादळ होऊन धुमसतोस.... पौर्णिमेचा चंद्र पाहताना... रातराणी धुंद बहरताना... वळवाच्या पावसात भिजताना.... अजुनही तुझी आठवण येतेच.... तुही अजुन विसरला नाहीस ना मला..? माहीतेय....त्याच क्षणात अडकलायसं.... बांधुन ठेवल्यासारखा.....की बांधुन घेतल्यासारखा..?

हुंकार

प्रत्येक वेळी तु दिसलास की, मनातलं वादळ अजुन जोरात उठतं... कुठतरी थोडी शांत झालेल्या मला पुन्हा उद्धवस्त करुन सोडतं..... खुप वाट पाहीली होती तुझी.... तु दुरदेशी जाताना विचारलही होतं... "माझ्यासाठी परत माझाच होण्यासाठी येशील ना?" तेव्हाही फ़क्त "हुं" असच केल होतस... मी त्यावरही विश्वास ठेवला होता.... वाट बघत बसले तुझी....पण... तु आलास तेही लग्न करुन.... सहचारीणी सोबत....मला विसरुन... इतके मोठे प्रश्न निर्माण झाले होते का रे? इतकी वादळं आली होती का? की ज्यासमोर माझा जराही विचार आला नाही मनात... घरच्यांचा निर्णयही हुंकारावरच निभावुन नेला असशील ना? पण तुझ्या त्या शांततेमुळे माझ्यावर आलेल्या वादळाचं काय??

"प्रेमभावना"

दाटी आभाळ तसेच पण नसे तुझी साथ वाटे खोली ही परकी वाटे परकेच अंगण...! माझ्या भाळी दुसर्‍याचे आता कुंकु रे वसते मनी तुझीच परि मी प्रेमभावना रे जपते...! येता पाऊस वळवाचा तुझी याद सख्या येते त्याच्या प्रत्येक थेंबात मज तुझा स्पर्श देते...! येता सांजवेळ सख्या मन व्याकुळ रे होई वाट पाही तुझ्या येण्याची पण कुंकुवाचा धनी येई...!

"भुतकाळाचे काजळ"

माझ्या डोळ्यात सदा असे तुझाच दरवळ... जणू ल्यायले मी, भुतकाळाचे काजळ...! मनातही सारखा असे तुझाच चेहरा... तुझा आठवांचा जणु मजवर आहे पहारा...! कसा रे हा आपुल्य़ा प्रेमाचा हा असा डोह... दुर सारलो गेलो तरी देई वेदना नेहमी दाह..!

"पाऊसवेडी"

ऋतु आला पावसाळी सार्‍या मातीला सुगंध मनी आठवांच्या तुझ्या सख्या येतो रे गंध...! आठवे भेट आपुली होता पावसाचा जोर चिंब झालेल्या मला तुझ्या मिठीचा आधार...! तुझ्या प्रेमाच्या सरीत माझा अणु-रेणु भिजलेला तेव्हा पाऊसही कसा खट्याळ होऊन बरसलेला...! ओसरता पाऊस जसा येई निसर्गात गारवा माझ्या मनातही सख्या तुझ्या आठवांचा पारवा...! आला पाऊस की मी होते रे "पाऊसवेडी" जशी तुझिया प्रेमात आहे मी रे "प्रेमवेडी"...!

प्रेमाचा सोहळा..

आकाशाच्या कुशीत चांदणं अलगद निजेल तुझ्या कुशीत येऊन प्रेमात मी चिंब भिजेन...! गारठलेल्या पहाटेत हवी ऊब तुझ्या मिठीची तुझ्या बेभान स्पर्शात न उरेन मी माझी...! स्वप्नातल सारच कस सत्यात उतरलेलं असेल तुझ्या माझ्या प्रेमाला पारिजातकाची साथ असेल...! रंगुन रंगात तुझिया होई रंग माझा वेगळा सकाळही करेल साजरा आपल्या प्रेमाचा सोहळा...!

दुरुन डोंगर साजरे...

दुरदेशी असलेल्या मुलाची व्यथा...प्रयत्न केलायं बघा जमलाय का? : : : इथं दुरदेशी आलोय मी पण खरतर फ़ार फ़ार एकटा पडलोय मी खुप खुप पश्चाताप होतो माझ्या तेव्हा घेतलेल्या निर्णयाचा विचार येतो फ़क्त "करियर ग्रोथ" आणि "गलेलठ्ठ पगार" एवढच हवं का जगायला सांग ना गं सये... तु का "नको जाउस" अस म्हणालीस का नाहीस थांबवलस मला आता ना हे एकटेपण खातयं गं मला फ़क्त घर आणि ऑफ़िस एवढच विश्व उरलयं घर तरी का म्हणु...कुणी वाट बघणारं इथं कुठं राहीलयं पिंजर्‍यात बंद आहे मी अस वाटत जो तोडून बाहेरही नाही पडू शकत खुप आठवतो मायदेश आई-वडीलांची माया,तुझं खुळं प्रेम,मित्र... आईच्या हातच जेवण...सगळचं तिथले संस्कार तिथली संस्कृती... त्याउलट आहे हा परदेस खरचं गं सये, कळतयं आता आपलं ते आपलं डोंगर नेहमी दुरुनच साजरं...

...सत्य...

सत्य समोर आलं की घाबरतात सारे सामोर जायला... देतात संस्कृतीचे दाखले उगा "आपल्यात नाही हं असलं काही घडत.." अस म्हणून दुर्लक्ष करतात सत्याकडे पूर्वी हाय सोसायटीत घडायचं.. घडतयं ते आता सगळीकडे wife swapping काय नि डिस्कोथेकमधे रात्र घालवारी तरुणाई काय.. only fun is imporatant... पैसे जास्त मिळतात ना त्याच करणार तरी काय??? म्हणुनच हातात त्यांच्या मद्याचे पेले येतात. तुमची so called संस्कृती ज्यात ते रिचवतात. आपण मात्र अगदी ढीम्म होऊन बघत राहतो. आणलं कुणी समोर हे तर, त्यालाच संस्कृती शिकवतो. संस्कार सारे नामशेष होतायत आता... कमी पडतो पॉकेट मनी म्हणून मुली कॉल गर्ल म्हणून स्वतःला विकतायत आता... आपण मात्र फ़क्त बघ्यांची काम करतोयं.. आणि पडणार्‍या संस्कृतीच्या भिंती सावरण्याचा प्रयत्न करतोयं... खरचं प्रयत्न करतोयं का??????

लग्नाचा बाजार...

बाजारच झालाय सगळा... अपेक्षा ठेवायच्या नुसत्या शिकलेली,सुंदर मुलगी आणि त्यात हवा हुंडा लाखभर, दागिनेही हवेतच हं १५-२० तोळ्याचे... बिचार्‍या मुलीच्या बापाला खर्चात भर.. म्हणे "इंजिनियर आहे मुलगा" शोधून मिळायचा नाही ’वर’ असा.. इतकं करुनही यांच्या अपेक्षा नाही सरत नाही झाल्या पुर्ण या अपेक्षा की, मुलीला बसतील जाच करत. सोसायचं सार वधुपक्षानेच हा जणु नियमच झालयं लग्नाच्या ह्या बाजारात जणु आम्हा "मुलींना" भाव उरेनासा झालायं...

...देव...

दर्शन घ्यायला आले होते रे... पण तेही धड मिळालं नाही तुझ्याशी बोलायचं तर दुरच राहीलं... नुसती घाई गडबड.. मग शेवटी तिथे लावलेल्या, टी.व्ही वरच तुझं नीट दर्शन घेतलं.. आणि मनात जे होत ते तुझ्याजवळ मांडलं... द्यायला काहीच नव्हतं माझ्याकडे, आणि पासही नव्हता... म्हणुन असं झालं असेल का? म्हणजे बघ ना कस... वी आइ पी पास वाल्यांना, ओळखीच्या लोकांना, निवांत दर्शन मिळतं... आम्ही मात्र ४-४ तास उभं रांगेत रहायचं... आणि तु धड आम्हाला तोंडही नाही दाखवायचं... अस का रे देवा????? तु आता फ़क्त श्रीमंतांचाच राहीलायसं का????

झाली कविता बाजरू..!!!

माझ्या कवितेत आता नाही तो सागर गहीरा आता आहे तिथे फ़क्त पैशांचा पहारा..! माझ्या कवितेत आता नाही ती संध्याकाळ वेडी आली भावनांनाही आता कुणा सांगणार्‍याची बेडी...! माझी कविता आता नाचे पैशाच्या तालावर झालाय तिला आता भावनांचा अनादर..! आधी होती माझी कविता एक स्वच्छंद पाखरु आता मात्र झाली माझी कविता बाजरू..!!!

सुर

मी देतो तुला साथ माझ्या स्वरांची... तू फ़क्त तुझ्या संगिताचे राग घेऊन माझ्या सानिसेच्या सुरांसोबत तुझ्या वीणेच्या सुरांना एकरुप करण्या नव्या सुराला जन्म देण्या सये तू ये.....

सये तू ये....

निळ्या आसमंताची निळाई लेवुन त्या खोल नदीची गहराई घेउन त्या बेभान वार्याला श्वासात भरुन मला सुखावण्या सये तू ये.... मुक्त मुक्त तुझे श्वास धुंद धुंद ही वेडी रात या रातीत सये तुझा सहवास देण्या बेधुंद होऊन फ़क्त माझी होण्या सये तू ये......

तू ये....

वेड्या भावनांना वाट करुन देण्या... अमुर्त प्रेमाला मुर्तता देण्या.... माझ्या सुरांत सुर जुळवण्या... माझ्या मनाचा ठाव गं घेण्या.... न बोलता काही फ़क्त नजरेने गुज करण्या... मलाच मजपासुन चोरण्या..सये तू ये....

एकटा

या जगाचा रे मित्रा हा वेडा नियम आहे एकटे येऊन सार्‍यांस एकटेच जाणे आहे सार्‍यांनाच शाप येथे असे एकलेपणाचा तू हा असा एकटा कुणी असे गर्दीतही एकटा नको वेळ दवडू व्यर्थ मूळ शोधण्या एकटेपणाचे त्यापेक्षा अनुभव आयुष्य शोध नवे मार्ग जगण्याचे

विरहाचं लेणं...

तुझ्या विरहाचं लेणं माझ्या डोळ्यात नेहमीच अश्रुरुपात असतं तुझ्या डोळ्यातलं आभाळ मात्र नेहमी कसं कोरडसं असतं मला मोकळं झाल्याशिवाय चैनच पडत नाही... तुला कसं अस सगळं मनात ठेवणं जमत???

तु सोबत असताना....

भांडते आकाशाशी... तुझ्या आठवांशी भांडताना... नाही ना रे जमत ते तु सोबत असताना... : : तु सोबत असताना, वेडं मन कधी दुःखाने भरुनच येत नाही... म्हणुनच तुझ्यासोबत असताना रडावसं वाटत नाही.. डोळ्यात पाणी आलं तरी आनंदानं येतं.. पण हसण्या हसण्यात ते पाणी, डोळ्यातच विरुन जातं... मग सांग कशी रडू तु सोबत असताना???

मनाचं आभाळ...

तू जवळ नसताना नेहमीच मनाचं आभाळ भरुन येतं... डोळ्यातुन आसवांवाटे तेही मग कोसळून जातं... मोकळ्या झालेल्या त्या स्वच्छ आभाळी तुला चांदणी दिसते... तुला मात्र ती माझ्यासारखी भासते...

तुझी स्वप्नं...

वार्‍यावर लहरते मी... अंबर कवेत घेते मी... स्वप्नांना त्या मोरपिसापरि जपते मी.. झुळझुळणार्‍या नदी-खळ्यातुन ओघळणार्‍या दव-थेंबातुन डुलणार्‍या रानफ़ुलातुन चमचमणार्‍या चांदतार्यातुन पावसाच्या प्रत्येक सरीतुन गोंडस फ़ुलाच्या गंधातुन कणाकणातुन-मनामनातुन तुझी स्वप्न जपते रे... तुझ्या स्वप्नांशि बोलते रे.. तुझी स्वप्न जागते रे.... तुझी स्वप्न जगते रे....

...ओंजळ...

हं...खरचं नाही जमत स्वप्नांना विसरणं... आणि ज्याच्यासोबत पाहिलीत त्यालाही... म्हणुनच कठीण होतय मलाही... तुला विसरणं... अजुनही माझ्याकडून होतयं प्रत्येक स्वप्नात तुलाच जपणं... आता जपेन तुझी स्वप्न... नाही हरवू देणार... ठेवेन नेहमी सोबतच.... भरुन घे तुझी ओंजळ.. पण एक सांगते यापुढे तुझी ओंजळ कधीच रिती राहणार नाही याची गाठ बांधते...

सौदागर स्वप्नांचा...

तुझी ओंजळ कशी रिती???? तू तर सौदागर स्वप्नांचा... माझी नाही तर मिळतीलच कुणाची ना कुणाची स्वप्न तुला... माझं काय रे....पुरेल तु दिलेला क्षणिक सुगंध मला.... स्वप्न तर हवीच रे.... आयुष्य जगण्यासाठी... पुढे पुढे जाण्यासाठी... स्वप्न नसतात हं क्षणिक.. गैरसमज आहे तुझा.. मिरवतो आम्ही पूर्ण-अपुर्ण स्वप्नांचा बोझा... नाही जमत तुझ्यासरखं... सौदा झाला की विसरणं...

...सुगंधी स्वप्न...

हो रे....... खरचं थकलेयं.... भिरभिरणार्‍या स्वप्नांमागे धावुन पुरती दम्लेयं.... मोगर्‍याची फ़ुलं...असेल का ना स्वप्नातली... पण सुगंध देतायत ना....तेच बस झालं... पण तुच सांग सख्या.... नेहमीसाठी गंधीत करतील का माझ्या स्वप्नांना...??? सुकल्यावर फ़ुलं कसला आलायं गंध... पापण्यांना येईल आसवांचा बंध... मग उगाच का देतोयसं क्षणिक सुखाचा आनंद...

स्वप्नांचा सौदा...

असं का म्हणतेस???? स्वप्नांचा सौदा मी स्वप्नांच्या बद्ल्यात करतो.. तिथं कसला आलायं भाव??? महाग आणि स्वस्त... हे या बाजारात, ठरवायचचं नसतं इथं फ़क्त स्वप्न पहायची असतात... माझं तर कामच ते... स्वप्न दाखवणं.... खरचटतात का मनं??? मग मी...माझं काय होत असेल... स्वतःच मन मारुन जेव्हा मी 'माझ्या' स्वप्नांचा सौदा करत असेल....

...स्वप्नांचा बाजार...

कळतयं रे...तो माझ्या स्वप्नांचा मुसाफ़िर खरचं असा...वारा होऊन दुर दुर जाणारा.... मी जपलेल्या आठवणींनाही स्वतःसोबत नेणारा... खरच वेडीच आहे मी...ठार वेडी.... दूर जाणार्या त्याला आणि स्वतःसोबत... माझ्या स्वप्नांनाही नेणार्याला... थांबवू पाहतेयं....घालू पाहतेयं माझ्या प्रेमाची बेडी... पण आता ठरवलयं...दुरच रहायचं त्याच्यापासून.... त्याच्या आठवणींपासून.... स्वप्नातही येऊ नाही द्यायचं त्याला.... याचा अर्थ असा नाही की, स्वप्नांपासूनच तोडतेय स्वतःला... बोलणार मी स्वप्नांशी.... बघेन मी स्वप्न, रंगवणार नवीन स्वप्न... फ़क्त एवढच करेन....वाटलं कितीही तरी... त्याची स्वप्न मी बघणार नाही.... माझ्या स्वप्नांचा असा पुन्हा बाजार त्याला करू देणार नाही...

...वेडी स्वप्नं...

खरचं..असतोच स्वप्नांना प्रकाशाचा धाक... कारण उजळता आकाश अन् येता सुर्य ती होऊन जातात खाक... विरून जातात प्रकाशासोबत... उडुन जातात वार्यासोबत... नाही उरत काहीच.... खरचं????...असं कसं...उरत ना काहीतरी..आठवणी... आठवणी तर उरतात...मग त्या स्वप्नातल्या का होईना... जपते आपली स्वपन आठवणी म्हणून... त्या वाहून गेलेल्या वार्याच्या मागे जाते... येणार नाही हातात कधी ती स्वप्न...हे माहीत असून... त्या वेड्या स्वप्नांच्या मागे धावते... स्वप्नांशी बोलते...त्यांच्याशी भांडतेही... ही वेडी स्वप्नही बघ ना कशी... सारखी मला खुणावतायतं स्वतःकडे.. ओढून घेतायतं...स्वतःकडे... अगदी वाळवंटातल्य़ा मृगजळासरखी....

तुझ्या शब्दांना अर्थ देण्या....

येशील??म्हणजे.... तुझ्या या आर्त हाकेला तरी मला साद द्यावीच लागेल.... आणि सख्या.... मी नाही दिली तरी... माझे सुर...माझे सुर कसे दुर पळू शकतील... मला यावचं लागेल.... तुझ्या शब्दांना माझा सुर द्यावाच लागेल... येईन मी...तुझ्या शब्दांना सुर देण्या... तुझ्या शब्दांना अर्थ देण्या.... माझ्या सुरांनी तुझे शब्द पुन्हा बहरतील.. अन तुझ्या शब्दांमूळे माझे सुर... मला पुन्हा नव्याने गवसतील.... तुझ्यासाठी...तुझ्या शब्दांसाठी.... मी परत येईन... तेव्हा होईल.... तुझ्या शब्दांचा अन माझ्या सुरांचा नवीन जन्म होईल ना??????

फ़क्त तुझ्याच शब्दांसाठी....

माझ्या राजा...असं नाहीये काही... : : : सुर खुलुन येतात माझे कारण त्यांना साज देतात शब्द तुझे तुझ्या शब्दांतून तु माझ्या ्सुरांना एक नवा अर्थ देतोस... अन त्यातुनच आपल्या सुंदर आयुष्याच गाणं निर्माण करतोस... खरतरं तुझे शब्द आहेत म्हणून गाते मी... माझे सुर जन्म घेतात... ते फ़क्त तुझ्याच शब्दांसाठी...फ़क्त तुझ्याचसाठी...

आज तु पुन्हा आलास...

आज तु पुन्हा आलास... नेहमीसारखाच, न सांगता, न बोलता, न विसरता.. तस मलाही आवडत तुझ असच येणं वर्षभर चुकवलेल देणं एका क्षणात देऊन जाणं... तु आल्यावर मी एकदम वेडीपिशी होऊन जाते तुझ्या रुपाला पाहण्यात दंगुन जाते... कधी थेंब-थेंबात बहरतोस, कधी धो-धो कोसळतोस, तर कधी रात्रभर बरसतोस तू माझ्या वेडया मनाला का बरे उगाच तरसवतोस तू?? तुझी किती वाट पाहिलेली असते मी माझ्यातल्या 'मी'ला विसरलेली असते मी आपल्यातल्या प्रितीला एकटीनेच जपलेले असते मी तु मात्र आरामात येतोस आणि मला चिंब-चिंब भिजवुन जातोस प्रतिक्षेला कंटाळलेल्या मनाला दिलासा देऊन जातोस पण ह्यावेळी तुला मी नाही जाऊ देणार गेलास तर मीही तुझ्या बरोबर येणार तुझ्याशिवाय मला इथे एकटीला नाही राहायचं तुझ्या आठवणीत मला आता नाही जगायचं नेहशील ना रे मला तुझ्या सोबतीला आकाशातील थंड थंड ढगांच्या भेटीला तुझ्याबरोबर मीही हसेन,वावरेन,बरसेन पण सांग ना रे तु मला नेहशील का?? तुझ्यासवे जगायच स्वप्न पुर करशील का??

आला आला सखे

आला आला सखे बघ पाऊस आला येताना संगे गार वारा घेऊन आला थेंबा-थेंबात ग त्याच्या आनंद साठलेला अन मातीचा सुंगध साऱ्या आसमंतात दाटलेला काळे-काळे ढग पाहुनी मोर थांबलेला फुलवुनी पिसारा सारा थुई-थुई नाचलेला सरीवर-सरी बघ कश्या कोसळत चालल्या वेडया मनाच वेडेपण त्या वाढवत राहिल्या चिंब-चिंब भिजुनी तन पावसात न्हालं गारठुन वेड मग रजनीच्या कुशीत शिरलं

आले ते क्षण

आले ते क्षण, गेले ते क्षण झाले होते मन उगाच बैचन मज हसवुन गेले ते, मज फसवुण गेले लवताच पापणी डोळ्यांतुन सांडुन गेले क्षण नयनाची भाषा शिकवुन गेले ते, स्पर्शाची आशा दाखवुन गेले या जगण्याची दिशा बदलवुन गेले क्षण आठवणींच रान पेरुन गेले ते, स्वप्नांच दान देऊन गेले उरातील चैतन्याची खाण दाखवुन गेले क्षण रात जागऊन गेले ते, पहाट खुलवुन गेले क्षणक्षणाला आनंद उधळुन गेले क्षण

आज पुन्हा आठवणी आल्या

आज पुन्हा आठवणी आल्या पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या सुनं आकाश चांदण्यांनी भरुन आलं वेड मन पुन्हा भुतकाळात रेंगाळलं आठवाणींची सोबत आहे म्हणुनच दुःखातही चेहऱ्यावर हसु उमटतं काळ कितीही पुढे सरकला तरी क्षणभर थांबुन मागे वळाता येतं जी माणस हवी-हवीशी वाटतात ती नेहमी आठवणीत साठवली जातात सार जग पोरक्या नजरेने पाहत तेव्हा मनात तिच आठवली जातात साऱ्या क्षणांना मला जपावास वाटत मनाच्या एका कोपऱ्यात ठेवावस वाटत म्हणजे हव तेव्हा मला तिथे जाता येईल त्यांना कुशीत घेऊन थोडस जगता येईल

अशीही एक रात यावी

अशीही एक रात यावी तुझ्या प्रेमात मी भिजुनी जावी चांदण्यांचा प्रकाश असावा तुझा हात माझ्या हातात असावा दोघांनीही नुसतच चालत रहायच वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर झुलत रहायच तु शांत माझ्याकडे पाहत असलेला मी निवांत तुझ्या मिठीत विसावलेली शब्दांची देवाणघेवाण होऊ नये ओंठातील अबोलाही सुटु नये पैजणाचा आवाज होऊ नये चंद्रावरचा डागही कोणाला दिसु नये दोघांचीही मन संथ पाण्याप्रमाणे व्हावीत मनावर उठणारे भावनांचे तरंग विरळ व्हावीत सुख-दुःखाचा गाळ क्षणभर तळाशी बसावा अश्या ह्या राती मी तुझी आणि तु माझा असावा...

पहिला स्पर्श...

मला आजही आठवतोय तुझा तो पहिला स्पर्श माझ्या मनाला झालेला हर्ष बाजुला पसरलेली ती गर्द झाडी तुझ्या प्रेमात बेभान झालेली मी एक वेडी मावळत्या सुर्याची असलेली उपस्थिती मनाची झालेली चल-बिचल स्थिती मला आजही आठवतोय तु धरलेला माझा तो हात माझ्या देहाचा झालेला थरकाप तुझ्या खांद्यावर डोक ठेऊन मी किती बिनधास्त होते.... साऱ्या जगाला विसरुन तुझ्या रंगात रंगले होते....

वाळलेल पान असच उडत राहणार..

वाळलेल पान असच उडत राहणार.. चिमटीत न येणार दु:ख ओंजळ भरुन वाहणार सुख तरिही मी मात्र उभी स्तब्ध पुन्हा एकवर शब्द होतात निःशब्द अंधारात गडप होणाऱ्या वाटा काळजात खोलवर रुतलेला काटा संपुन गेले अंगातील त्राण आता उरला फक्त देहात प्राण एकटीच आली, एकटीच जाणार दिल घेतल सगळ इथच राहणार तरीही मी जगत राहणार वाळलेल पान असच उडत राहणार..

कधी कधी असही होत...

कधी कधी असही होत... गर्दीत राहुनही मनाला एकट एकट वाटु लागत एकटेपण म्हणजे काय आयुष्यात प्रथमच कळु लागत कधी कधी असही होत... नेहमीच उगवणारा दिवस अगदीच नवा-नवास वाटु लागतो कुणा एका व्यक्तीचा सहवास हवा-हवासा वाटु लागतो कधी कधी असही होत... ओठांपर्यंत आलेले शब्द ओठांतुनच परत फिरतात त्यांचा उच्चार न होताच समोरच्याला ऎकु जातात कधी कधी असही होत.. कधीही न झुकणारी नजर नकळत जमीन पाहु लागते तिच्या गालावरची खळी त्याला होकार देऊन जाते

कुणीतरी असाव...

कुणीतरी असाव... हळव्या मनास जपणार, कुशीत घेऊन समजवणार, एकांतात आठवण काढणार, मौनाची भाषा जाणणार... कुणीतरी असाव... माझ्यावर हक्कने रागवणार, माझा रुसवा प्रेमाने काढणार, दुःखात अश्रु होऊन साथ देणार, सुखात हास्य होऊन फुलवणार... कुणीतरी असाव... कधी पाऊस होऊन बरसणार, तर कधी प्रत्येक श्वासात मिसळणार, चांदण्या राती हातात हात घेणार, पहाटेच्या स्वप्नात येऊन हसवणार... खरच कुणीतरी असाव... जे फक्त आपल आणि आपल असाव दुर राहुनही मनाच्या जवळ भासाव...

सख्या मला तुझ्या कुशीत घे ना !!

सख्या मला तुझ्या कुशीत घे ना !! तुझा हात माझ्या हातात दे ना !! आज मला खुप भीती वाटतेय रे डोळ्यासमोर काळी सावली दिसतेय रे मध्येच तिचा आकार महाकाय होत जातोय तर कधी लहानश्या ठिबक्याइतका होतोय माहीत आहे मला ती मला गिळणार आहे.... सर्व खेळ क्षणात संपणार आहे.... तत्पुर्वी मला थोडस... अगदी थोडस... जगावस वाटतय... कुसकरण्यापुर्वी कळीला फुलावास वाटतय...

क्षितिज

डोळ्यासमोर दुरवर एक क्षितिज दिसतय.. मी जवळ येण्यासाठी मला हलकेच खुणावतय.. माहीत नाही का? पण मलाही त्याच्या जवळ जावस वाटतय.. एक अनामिक ओढ मला त्याच्याकडे खेचतेय अस जाणवतय.. माझ्याही नकळत माझ पाऊल त्याच्यादिशेने वळले आहे.. अन...एक अखंड प्रवास सुरु झाला आहे.. मुक्कामाच ठिकाण निश्चित नाही.. अंंतर किती कापाव लागेल याचाही पत्ता नाही.. कदाचित या प्रवासात मला बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागतील.. पाऊले थकली तरी पुन्हा उचलावी लागतील.. कधी चालाव लागेल,कधी धावाव लागेल.. तर कधी श्वासांशी लागलेली शर्यत जिंकावी लागेल.. कारण ती हरले तर सर्वच संपेल.. अन..माझा हा प्रवास अर्ध्यातच उरकेल.. नाही..तस मी घडु देणार नाही... एवढ्या सहजासहजी माझा कणा मोडु देणार नाही... खात्री आहे मला माझ्या यशाची.. आशा आहे क्षितिजाला एकदाच गाठण्याची..

मैत्री म्हणजे ..

मैत्री म्हणजे दोन मनानंच नाजुक बंधन मैत्री म्हणजे मनाने मनाला केलेले वंदन मैत्री म्हणजे अबोल शांततेत होणारा संवाद मैत्री म्हणजे काळजाला भिडणारा निनाद मैत्री म्हणजे एकाच्या सुखासाठी दुसऱ्याच तडफडण मैत्री म्हणजे स्वःताहा पडत असतानाही दुसऱ्याला सावरण मैत्री म्हणजे स्पर्श न करता दिलेला आधार मैत्री म्हणजे सहवासातुन साकार झालेला आकार मैत्री म्हणजे वाळवंटात पाण्याचा झालेला भास मैत्री म्हणजे शेवटच्या क्षणापर्यत घेतलेला श्वास मैत्री म्हणजे एकाचा दुसऱ्यावर असलेला अतूट विश्वास मैत्री म्हणजे दोघांच्याही नकळत होणारा अखंड प्रवास

कसा रे तु असा

कसा रे तु असा कधी चांदणीला झुरवणारा तर कधी तिला प्रेमात चिंब-चिंब भिजवणारा कसा रे तु असा रोज एक नव रुप धारण करणार रात्रीच्या काळॊखाला तुझ सौदर्य बहाल करणारा कसा रे तु असा ढगाआड लपणारा स्वःताहच प्रतिबिंब सागरात स्वःहाच न्याहाळणारा कसा रे तु असा सर्वांना शितलता देणारा नितळ, निखळ प्रकाशाची सतत उधळण करणारा कसा रे तु असा प्रेमाची साक्ष देणारा आपल्या मोहक रुपाने सुंदरीना घायाळ करणारा नाही रे कळत मला कसा रे तु आहेस पण एवढ मात्र खर माझ्या जीवाभावाचा सखा तु आहेस....

मला कधी कळलच नाही..

नियम माणसांसाठी कि माणुस नियमांसाठी??? मला कधी कळलच नाही आपण देवाला दगड मानतो कि दगडाला देव मानतो??? मला कधी कळलच नाही हसता-हसता रडायचं कि रडता-रडता हसायचं??? मला कधी कळलच नाही प्रेमात 'स्व'ला जपायचं कि 'स्व'ला जपण्यासाठी प्रेम करायचं??? मला कधी कळलच नाही

तूझं माझ्या आयुष्यात येण

तूझं माझ्या आयुष्यात येण मैत्रीचा संदेश देऊन गेलं, निराधार झालेल्या मनाला आधार देऊन गेलं तूझं माझ्या आयुष्यात येण, मला क्षणोक्षणी हसवून गेलं, हरवलेल्या बालपणाची पुन्हा एकदा आठवण करुन गेलं तूझं माझ्या आयुष्यात येण मला नवजन्म देऊन गेलं रंग विसरु पाहाणाऱ्या 'चित्रा'ला, रंगाची आठवण करुन गेलं तूझं माझ्या आयुष्यात येणं मला माझं वेगळेपण दाखवून गेलं, मैत्री ह्या नात्याची गरज निर्माण करुन गेलं तूझं माझ्या आयुष्यात येणं मला खुल्या आकाशात घेऊन गेलं, जीवनाच्या ह्या वाटेवर खऱ्याखुऱ्या मित्राची साथ देऊन गेलं

भीती

जवळच्या माणसांना होणाऱ्या मरणाप्राय यातना बघत असते त्यांच्या मनाला जीवंतपणी जळताना बघत असते म्हणुनच की काय मला आता मरणाची भीती वाटत नाही आयुष्याभर जिंकलेल्यांना क्षणात हरताना बघत असते हार सहन करताना त्यांच्या मनाचा होणारा कोंडमारा बघत असते म्हणुनच की काय मला आता हरण्याची भीती वाटत नाही किल्लाच्या बुरुजाला तोफेच्या एका वारात कोसळताना बघत असते बुरुज कोसळल्या नंतर त्याची होणारी दयनीय अवस्था बघत असते म्हणुनच की काय मला आता कोसळण्याची भीती वाटत नाही प्रकाशात टवटवीत असणाऱ्या फुलाना काळोखात कोमजताना बघत असते कोमजल्या नंतर त्यांच्या सुकलेल्या पाकळ्यांना बघत असते म्हणुनच की काय मला आता काळोखाची भीती वाटत नाही सदा हसत असणाऱ्या चेहऱ्यांना एकांतात रडताना बघत असते त्यांच्या डोळ्यांत आलेला आसवांचा पुर बघत असते म्हणुनच की काय मला आता रडण्याची भीती वाटत नाही खरच मला आता कशाचीच भीती वाटत नाही..... पण मला कशाचीच भीती वाटत नाही ह्या गोष्टीची मात्र मला खुप भीती वाटत आहे....

रुप माझ्या सख्याचे

अमृताहुन गोड तुझी वाणी काळजाला भिडणारा सुमधुर ध्वनी ओठावर असते मादक हास्य शब्दाना निस्तब्ध करणार भाष्य आधार देणारा मजबुत खांदा मन धुंद करणारा पुरुषी बांधा डोळ्यातुन फुलते प्रेमाची कळी पाहुनी तव मनी मदन जळी नजर जाता आकाशावरती जमती चांदण्या अवतीभोवती चंद्राला फिक पाडणार हे रुप वाढवतो माझा जगण्याचा हुरुप

चांदण्या रात्री..

चांदण्या रात्री निघाला साजणा सजणीला भेटाया, चंद्रही आला सोबतीला त्यांच्या प्रेमाची साक्ष बनाया... जवळ तो येताच, मीटली ती लाजाळुच्या पानासारखी अन भासली त्याला ती चांदण्यात न्हाऊण आल्यासारखी... बघुणी तिला लाजताना मन त्याचे खटयाळ झाले, तिच्या रुपाच्या सौर्दयाने चंद्रालाही घायाळ केले.. थंड गुलाबी हवा पदर तिचा उडऊ लागली... तशी ओठांवरली लाली गालांवर उमटु लागली डोळ्यांच्या त्याच्या इशारे ओठानां तिच्या उमजाया लागले अन कानाजवळ येऊन भोवरा प्रेमाचे गीत गुणगुणाया लागला.. स्पर्शासाठी तीच्या तो कासावीस होऊ लागला, थरथरणाऱ्या तिच्या हातांना हळुच हातात घेऊ लागला.. क्षणार्धातच ती मिठीत त्याच्या विसावली जणु अंनतकाळापासुन वाहणारी नदी सागराला जाऊन मिळाली

विसरले नाही..

दगडाच्या देवाला पूजताना, माणसातील देव पाहण विसरले नाही नात्यातील गुंता सोडवताना, भावनांचा आदर करण विसरले नाही नियतीच्या घावांना झेलताना, जगण्याचा आनंद लुटण विसरले नाही रडण नशीबी आल, तरी खळखळुन हसण विसरले नाही आपला अहंकार चेपताना स्वभिमानाला जपण विसरले नाही पारीजातकाचा सुगंध घेताना त्याच्या इवल्यशा जीवनरेषेला विसरले नाही अमावस्येच्या रात्री झुरताना पौर्णिमेच चांदण विसरले नाही वैशाखात तापताना 'वर्षा'तील गारवा विसरले नाही स्वप्नामध्ये रमताना वास्तवातील सत्याला विसरले नाही भविष्याकडे बघताना वर्तमान काळातील जगण विसरले नाही उगवत्या सुर्याच स्वागत करताना अंधारातील वाटचाल विसरले नाही कवितेचा छंद जोपासताना, जीवनाच व्याकरणही विसरले नाही

कोण आहेस तू....

गीतातील माझ्या सूर आहेस तू गझलेतील माझ्या शेर आहेस तू देहातील माझ्या श्वास आहेस तू मनातील माझ्या विश्वास आहेस तू आकाशातील माझ्या तारा आहेस तू भोवातालचा माझ्या वारा आहेस तू डोळ्यांतील माझ्या काजळ आहेस तू अंतःरातील माझ्या वादळ आहेस तू दुःखाशी लढण्याची शक्ती आहेस तू ह्या वेडया मीरेची भक्ती आहेस तू कसं सांगु रे तुला, कोण आहेस तू 'चित्रा'तील दुनियेचा रंग आहेस तू

शब्द माझे

शब्द माझे..... कधी पाऊस पाडुन भिजवतात कधी चंद्र बनुन लाजवतात मनातील भावनांना तेच तर जपतात शब्द माझे..... कधी दुःखाच्या दरीत ढकलतात कधी आठवणीच्या देशात भटकतात काळॊखातील अश्रुनां तेच तर पुसतात शब्द माझे.... कधी स्वप्नांमध्ये रमवतात कधी वास्तवातील कटु सत्य दाखवतात जीवनाचा अर्थ तेच तर सांगतात शब्द माझे.... कधी भावनांचा बाजार भरवतात कधी अश्रुनां विकत घेतात कडेलोट होणाऱ्या देहाला तेच तर सावरतात.. शब्द माझे... कधी वाऱ्याबरोबर डोलतात कधी माझ्याबरोबर चालतात चालताना मात्र मला ‌ऋणाईत बांधतात.... ऋणाईत बांधतात....

प्रेम म्हणजे ..

प्रेम म्हणजे संगीतातील राग आयुष्याला सुगंधमय करणारी फुलांची बाग प्रेम म्हणजे मनाचा हूंकार तिच्या झुकलेल्या नजरेतून त्याला मिळालेला होकार प्रेम म्हणजे एक सुरेल गीत दोन अनजान जीवांची एकमेकावर जडलेली प्रीत प्रेम म्हणजे भक्ती जगण्याला प्रेरणा देणारी विलक्षण शक्ती प्रेम म्हणजे अतुट बंधन मनाला बैचन करणार ह्रदयातील स्पंदन प्रेम म्हणजे सर्वस्वाच दान 'स्व' ला विसरुन घेतलेल अस्तित्वाच भान

मी आहे एक जलधार..

मी आहे एक जलधार न लागे पाठीशी आधार वाहते मी सपाट जमीनीवरुन तर कोसळते कधी उंच कडयावरुन चाखुणी सृष्टीचे माधुर्य वाढवले माझे मी सौदर्य भासले मी जरी कोमल मन नाही माझे दुर्बल साथ लाभता काळाची भीती न उरली कोणाची जाणला मी जीवनाचा अर्थ सातत्य हेच माझे सामर्थ्य

गोष्ट पांढऱ्या फुलाची..

ती एका छोटयाशा गावात रहात होती... ती वयाने खुप लहान होती.. जेमतेम ८ वर्षाची होती, तेव्हाची ही गोष्ट .. त्या गावात एक महादेवाच(शंकराच) मंदिर होत..त्या मंदिरासमोर एक पांढऱ्या फुलांच झाड होत.. त्या झाडाला अगदी लहान लहान नाजुक फुल यायची.. त्या फुलांना केशरी रंगाचा तेवढाच नाजुक देठ होता.... तिला ती फुल खुप खुप आवडायची. ती तिच्या मैत्रीणीं बरोबर त्या देवळासमोर खेळायला जायची.तिच्या मैत्रीनी चाफ्याची फुल गोळा करण्यात मग्न असायच्या..पण ही वेडी मात्र त्या पांढऱ्या फुलांना पाहण्यात गुंग होऊन जायची.त्या फुलांना एक वेगळाच वास होता जो तिला स्वःतहाकडे खेचुन घ्यायचा...ती सारी फुल ओंजळीत घेण्याचा प्रयत्न करायची पण तिच्या इवल्याश्या हातात ती मावयचीच नाहीत आणि तीने फुलांना हात लावला की ती कोमेजुन जायची मग तीला वाटायच की ती फुल तिच्यावर रुसली (अशी तिची भाबडी समजुत).तिने हात लावल्यामुळे त्या फुलांचा पांढरा शुभ्र रंग फिकट होऊन जायचा.मग तीला कसतरीच व्हायच. तीला नक्की काय व्हायच हे तीला कधी कळलच नाही. त्या फुलांचा गंध आठवत ती तशीच झोपुन जायची............. त्यानंतर काही दिवसांत ती मुंबईत राहायला आली..नवीन शहर,

पाऊस मला आवडतो...

पाऊस मला आवडतो... मग तो कसा का असेना... मला तो माझ्यापासुनच दूर घेऊन जातो... त्याच धो-धो कोसळण, सरीमागुन सरींनी देहावर वार करण, त्याच क्षणभरासाठी उन्हातल फिरकण प्रत्येक थेंबाच सुर्याच्या किरणांबरोबर चमकण... सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो..... त्याच हळुवार आगमन करण, चोर पाऊलांनी येऊन मनाच्या कुशीत शिरण, लहरीनुसार कधी संथ गतीन बरसण बरसताना हलक्या हवेबरोबर थोडस सरकण..... सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो..... त्याच सुकलेल्या मातीत एकरुप होण, खडकाळ जमीनीवरुन खळखळुण वाहण, अवनीचा देह क्षणात शांत करण तिच्या मनाला प्रेमाचा ओलावा देण..... सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो..... मन एकट असेल तर आठवांची मैफिल सजऊण देण, मैफिली असेल तर एकट करुन टाकण, आठवांना आठवताना कधी चेहऱ्यावर हसु उमटवण तर कधी नयनातील अश्रुंना आपल्या सोबत घेऊन जाण.... सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो..... मला त्याच्या आठवणीत नेऊन सोडण, त्याला माझ्या जवळ घेऊन येण, हजरो मैलांच अंतर क्षणात दूर करण, दोघांची मन एकमेकांच्या प्रेमात भिजवण.. हे फक्त त्या पावसालाच जमत... म्हणुन मला पाऊस आवडतो..... खरच मला तो खुप खुप आवडतो......

Learn love lessons from nature

Look around to observe things as if you are seeing them for the very first time. Become one with the object of observation. The sun provides light and warmth irrespective of who benefits from it. It shines on all. The clouds, rivers, mountains and jungles follow the same example of universal love. Tree provides shade, fruits and flowers for healthy environment and food for hungry with the same unattached benevolence for all. They do not demand any favor in return. The earth matures the seeds into healthy plants irrespective of who planted the seeds or who will benefit from them. This truly is like mother's love which is equal and forgiving for all children even when some are the cause of hurt to her. If one learns from nature, the world will be a much better place as the destructive tendencies like jealousy, envy, hatred and selfishness will be eliminated. A new era of mutual love and trust will dawn on earth. All differences of caste, color, race, gender and age will melt away. Mo

The Divine love.

Sharad’ means winter and ‘mahotsav’ is festival. Though this is the month of Phalgun, it was in Sharad on a full moon night that millennia ago in Vrindavan a dance of love was performed by Krishna, a child of seven years and the gopis. This came to be known as ‘raas leela’. Swami Vivekananda said that the raas leela is an external expression of divine leela which takes place in the heart of each and every individual, between the finite and the universal soul. Unless we have unflinching love and faith, Krishna and his life would always baffle us. Take for instance Radha's love. So enchanted was Krishna with Radha's love, pure and divine, that He wished to experience it Himself. Radha told Krishna to incarnate so that she could infuse 'Radha bhava' in that incarnation. Sri Chaitanya Mahaprabhu is believed to be Krishna's incarnation with Radha Bhava. Only those who become "mad" with love can understand the love of gopis who are the personification of uncondi

For My Best Friend

This is for you, my best friend, the one person i can tell my soul too Who can relate to me like no other Who I can laugh with to no extents, Who I can cry too when times are tough, Who can help me with the problems of my life. Never have you turned your back on me Or told me I wasnt good enough Or let me down I don't think you know what that means to me You have went through so much pain and you still have time For me. And I love you for listening even when inside YOU are dying And I look up too you because you are strong, and caring and beautiful. Even though you don't think you are. And I hope you know that I am always here To listen to you laugh and cry and help In all the ways that i can And I will try to be at least half the friend you are To me. I hope you know I would not be the person I am today, with out you. My best friend.

Self Appraisal

A little boy went into a drug store, reached for a soda carton and pulled it over to the telephone. He climbed onto the carton so that he could reach thebuttons on the phone and proceeded to punch in eight digits (phone numbers). The store-owner observed and listened to the conversation: Boy: 'Lady, Can you give me the job of cutting your lawn? Woman: (at the other end of the phone line): 'I already have someone to cutmy lawn.' Boy: 'Lady, I will cut your lawn for half the price of the person who cuts Your lawn now.' Woman: I'm very satisfied with the person who is presently cutting my lawn.' Boy: (with more perseverance): 'Lady, I'll even sweep our curb and yoursidewalk, so on Sunday you will have the prettiest lawn in all of Palm beach.' Woman: 'No, thank you.' With a smile on his face, the little boy replaced the receiver. Thestore-owner, who was listening to all this, walked over to the boy. Store Owner: 'Son... I like your attitu

Make a Difference

A man was walking down a deserted Mexican beach at sunset. As he walked along he began to see another man in the distance. As he grew nearer he noticed that the local native kept leaning down, picking something up, and throwing it out into the water. Time and again he kept hurling things out into the ocean. As our friend approached even closer he noticed that the man was picking up starfish that had washed up onto the beach, and one at a time, he was throwing them back into the ocean. The first man was puzzled. He approached the man and said, "Good Evening Friend, I was wondering what you are doing?" And he replied, "I'm throwing these starfish back into the ocean. You see its low tide right now and all these starfish have been washed up onto the shore. If I don't throw them back into the sea, they will die from the lack of oxygen." "I understand," my friend replied "but there must be thousands of starfish on this beach and you couldn't po

When a Lizard can, Why Can't We?

This is a true story that happened in Japan . In order to renovate the house, Someone in Japan breaks open the wall. Japanese houses normally have a hollow space between the wooden walls. When tearing down the walls, he found that there was a lizard stuck there because a nail from outside hammered into one of its feet. He sees this, feels pity, and at the same time curious, as when he checked the nail, it was nailed 10 years ago when the house was first built. What happened? The lizard has survived in such position for 10 years in a dark wall partition for 10 years without moving. It is impossible and mind-boggling! !! Then he wondered how this lizard survived for 10 years without moving a single step--since its foot was nailed! So he stopped his work and observed the lizard, what it has been doing, and what and how it has been eating. Later, not knowing from where it came appears another lizard, with food in its mouth. Ah! He was stunned and touched deeply. For the lizard that was stu

Summer 69

I got my first real six-string Bought it at the five-and-dime Played 'til my fingers bled It was summer of '69 Me and some guys from school Had a Band and we tried real hard Jimmy quit and Jody got married I shualda known we'd never get far Oh when I lock back now That was seemes to last forever And if I had the choice Ya - I'd always wanna be there Those were the best days of my life(CHORUS) Ain't no use in complainin 'When you got a job to do Spent my evenin's down at the drive in And that's when I met you Standin on a mama's porch You told me that you'd wait forever Oh and when you held my hand I knew that it was no or never Those were the best days of my life(Chorus) Back in Summer of '69 Man we were killin' time We were young and restless We needed to unwind I guess nothin' can last forever, no And now the times are changin' Look at everything that's come and gone Somethimes when I play that old six-string I think about y

It's got to go

घराबाहेर पाऊल टाकलं नि एक बस समोरून निघून गेली. जरा अर्धं मिनिट आधी निघायला काय होतं असं मनात म्हणत मी परत घरात शिरले. बाहेर थंडीत १२ मिनिटं उभं राहण्यापेक्षा उबेत घरात थांबलेलं बरं. आत आलेच आहे तर म्हणून मग तीन जिने चढून मघाशी विसरलेली टोपी घेतली. ही नवी टोपी एकदम मस्त आहे. कान झाकणारी. शिवाय तीन वेण्या, दोन बाजूला दोन आणि शेंडीसारखी आणखी एक. मेड इन नेपाळ! पुन्हा बस जायला नको म्हणून मग लगेच बाहेर पडले. बसस्टॉपवर एक आजी आधीपासून उभ्या होत्या. त्यांना गुड मॉर्निंग घालून मी बसच्या वाटेकडे डोळे लावले. नकळत दोन्ही हातांनी कानावरून चाललेल्या टोपीच्या त्या दोन वेण्या ओढल्या आणि आजी बोलत्या झाल्या. "मस्त टोपी आहे ना!" "अं... हो. कान झाकते ना, त्यामुळे मला फार आवडली." मी तोंडभर हसून उत्तरले. या आधी कोणी बसस्टॉपवर असं गुड मॉर्निंग सोडून बोललं नव्हतं. इंग्रज लोकांशी, त्यातून ज्येष्ठांशी बोलायचं म्हणजे मला अजुनी जरा गडबडायला होतं. कुठे काय चुकेल अशी काळजी वाटत राहते. "दक्षिण अमेरिकेहून आणलीस का? इंकांच्याच असतात ना असल्या टोप्या?" "इंका!?" मला मी ऐकले ते बर

प्रयोगातून पोळी - १

उण्यापुऱ्या पंचवीस वर्षांच्या आयुष्यात स्वयंपाक करण्याची माझ्यावर कधीच वेळ आली नव्हती. घरी असताना आईला थोडीफार मदत केली होती; अगदीच काही नाही तर स्वयंपाक करताना बघितले तरी होते. बंगलोरात चार वर्षे राहून तीही सवय मोडली. कामावरून आल्यावर आपापल्या खोलीत जाऊन गप्पा टप्पा, नि काकूंची हाक आल्यावर थेट जेवणाच्या टेबलावर. त्यामुळे केंब्रिजला जाऊन आपापला स्वयंपाक करायचा या कल्पनेने मी धास्तावले होते. त्यातून मला भात आवडत नाही. म्हणजे पोळी करायला कसेही करून शिकायलाच पाहिजे होते. जाण्याच्या दोन आठवडे आधी, चार दिवस रजा घेऊन मी स्वयंपाकावरचा 'क्रॅश कोर्स' करण्यासाठी साताऱ्याला गेले. भाजी हा प्रकार सोपा आहे, हे लगेच लक्षात आले. तेलात काही बाही जिन्नस घालून चिरलेल्या भाज्या घालायच्या. कुठलेसे मसाले घालायचे की झाले. पण पोळीचे काम कठीण दिसत होते. सुरुवात कणीक मळण्यापासून. मुळात आपल्याला चार पोळ्या करायला किती कणीक लागते हे कळणार कसे? मग त्या कणकेत किती पाणी घालायचे, ते कसे कळणार? ही मोजामोजी शिकण्यात एक दिवस गेला. मग पुढची पायरी म्हणजे ती भिजवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी, उत्साहाने कणीक भिजवायला घेतल

प्रयोगातून पोळी - २

संध्याकाळी, नवे पीठ, नवा उत्साह, नवी आशा अशा नवोन्मेषशालिनी अवस्थेत पुन्हा पोळीप्रयोगांना सुरुवात केली. सुरुवातीलाच घोडे अडले. माझ्या हिशोबाने पुरेसे पाणी घालून झाले तरी पीठ काही नीट भिजेना. थोडे थोडे भिजलेले गट काही केल्या एकत्र येत नव्हते. चार गोळे दामटून एकत्र केल्यावर पाचवा त्यात दामटायला जावे तर एक नवीन गोळा 'आमचा फक्त बाहेरून पाठिंबा' असे म्हणून बाहेर पडत होता. शेवटी चमचा चमचा पाणी वाढवून एक दणकट 'मोडेन पण वाकणार नाही' असा गोळा तयार झाला. तवा केव्हाचा तापून तयार होता. 'कडक' कणकेतला एक छोटा गोळा घेऊन लाटायला सुरुवात केली. 'न दाबादाबीचा' दुसरा नियम पाळणे शक्यच नाही हे लगेच लक्षात आले. शिवाय लाटता लाटता पोळीच्या कडेला आपोआप कातरल्यासारखी नक्षी होते आहे असेही लक्षात आले. तरी तेल चोपडून घडी घातली की सगळे मार्गावर येईल अशी आशा वाटत होती. भरपूर तेल लावून घडी घातली. आता लाटणे थोडे सोपे झाले, तरी नव्या कडाही कातरू लागल्या. मी पिठी म्हणूनही तेच चपाती फ़्लॉर वापरत होते. तर त्यातल्या कोंड्यामुळे पोळीच्या मध्यात खळगे तयार होऊ लागले. जमेल तितके लाटून पोळी तव्यावर

नट्सफ़र्ड

२००३ सालच्या सप्टेंबर महिन्यात तनुला भेटायला मी नट्सफ़र्डला गेले होते. तनु माझी इंग्लंडमधली पहिली मैत्रिण. मी पोचल्याच्या दुसर्‍या आठवड्यात ती केंब्रिजला आली होती. माझ्या घराची, बँकेची वगैरे घडी बसवून मला तिच्या घरी नट्सफ़र्डला येण्याचं आग्रहाचं आमंत्रणही देऊन गेली होती. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी जाण्याचे बेत आखायला सुरुवात केली. नट्सफ़र्ड मँचेस्टरजवळचे एक छोटे खेडे आहे. समुद्राकाठी राजशिळेवर बसून लाटेला थांबण्याची आज्ञा करणार्‍या कनूट राजावरून याचे नाव पडले आहे. केंब्रिजहून नट्सफ़र्डला जायला थेट आगगाडीची सोय नाही. त्यामुळे तीन ठिकाणी गाडी बदलून जावे लागणार होते. मला इंग्लंडमधे पोचून एक महिनाही पुरा झाला नव्हता. इंग्रजी लोकांचे उच्चार काही केल्या कळत नसत आणि मी काय सांगते, विचारते आहे ते त्यांना कळतेय की नाही हेही कळत नसे. त्यामुळे तनुला माझी तशी काळजीच वाटत होती. मी मात्र 'त्यात काय; जमेल!' अशी निवांत होते. शुक्रवारी संध्याकाळी साधारण साडेचार पाचला केंब्रिजहून निघायचे, रात्री नऊपर्यंत नट्सफ़र्डला पोचायचे, शनिवार-रविवार तिथे हिंडून रविवारी रात्री घरी परत असा एकंदरित बेत होता. जातान

इथली तिथली माणसं

आज दुपारी बाजारात गेले होते. बाथ गावात शनिवारचा बाजार असतो. तिथे आजुबाजूच्या खेड्यात पिकलेली भाजी, फळे झालंच तर सरबते, लोणची, मुरंबे, खारवलेले मांसाचे प्रकार मिळतात. उघड्यावर मंडई असते तसा प्रकार. तशी एक बंद मडईदेखील आहे. तीही मी आधी बघितली नव्हती. त्या इमारतीची नक्षीदार दारं आमच्या ऑफिसातून दिसतात त्यामुळे तिथे जायची उत्सुकता होती. शिवाय आज हवा मस्त होती. पंचविसापर्यंत तापमान, हलके हलके ढग त्यामुळे उन्हाचा तडाखा नाही आणि मंद वार्‍याच्या झुळका. अगदी आल्हाददायक. कधी नव्हे ते गरम जाकीट, कानटोपी वगैरे न घालता बाहेर पडण्याची संधी. बाहेर पडल्यावर, चालतच जावं की काय असा विचार मनात आला की लगेच बस आली. बसमधे भरपूर टूरिस्ट कपड्यातले लोक. छोटे मोठे कॅमेरे घेतलेले, पाण्याच्या बाटल्या घेतलेले, उन्हाळी कपड्यातले, आनंदी लोक. मीही त्यांच्यातलीच एक होऊन गेले. गावात पोचल्यावर गर्दीबरोबर मी मुख्य चौकात पोचले. बाथमध्ये जी गरम पाण्याची कुडं आहेत, त्याभोवती बरंच जुन्याकाळातलं बांधकाम आहे. अगदी आपल्याकडच्या काळ्या दगडातल्या देवळांसारखं. मला तिथे आत कायम महाबळेश्वरचं कृष्णेच्या उगमाजवळचं देऊळ आठवतं. त्या कुं