कोरा कागद जितका कोरा तितकाच भरलेला.
भरलेला कागद फ़क्त त्यावरच्या शब्दांचा होवून राहतो. त्याच्यावर उमटणा-या प्रत्येक अक्षराची माळ पडते त्याच्या गळ्यात. मग पातिव्रत्याचं भान राखत तो फ़क्त आणि फ़क्त लिहिलेल्या अक्षरांशीच संग करतो.
त्यातूनही असतात काही, जे अक्षरांची बंधनं तोडून थेट भिडतात वाचकाच्या ह्रुदयाला. दाखवतात त्याला लेखकाचे अपुरे शब्द आणि त्यामागच्या अधु-या भावना.
को-या कागदाने मात्र छातीत रोखून धरलेली असतात विचारांची वादळं, दु:खाचे कढ आणि प्रेमाची एखादी गुलाबी झुळूक. It just keeps us guessing. काय उतरेल या कागदावर? लिहिली जातील का याच्यावर क्रांतीगीते? की हळूवार उतरेल एखादं प्रेमाचं द्वंद्वगीत? की गिचमिड अक्षर आणि कळकट मनाने यावर ओकला जाईल काळ्याकुट्ट शाईतून एखादा अश्लील मजकूर?
कुणास ठावूक.
कधी एखाद्या अस्सल पंजाबी संपूर्णसिंह गुलजार च्या हाती आलेल्या को-या कागदावर ’तेरे बिना जिंदगीसे शिकवा’ उतरतं तर कधी एका कर्नाटकातल्या प्रोफ़ेसराने लिहिलेल्या कागदावरची ’स्वामी’ किंवा ’ऑर्फ़ियस’ आतून हलवते.
एखाद्या तासाला वहीच्या शेवटल्या पानावरल्या ४ ओळी किंवा परिक्षा चालू असताना प्रश्नपत्रिकेच्या मागे उद्वेगाने लिहिलेली कविता असो, त्या बेट्या कागदाचं भविष्य काही भाकता येत नाही.
आजकाल को-या कागदावरून नजर ह्टत नाही. लिहिण्यासारखं काही नसतं म्हणून नाही तर वाचण्यासारखं खूप काही सापडतं म्हणून....
स.न.वि.वि. सारं काही क्षेमकुशल ना? खरंतर हे पत्र मी कसा आहे हे सांगण्यासाठी लिहीत आहे. त्यामुळे याहून जास्त ऒपचारिक होता येणार नाही. क्षमस्व.
मी ठीक आहे. म्हणजे तसा बरा आहे. रोज न चुकता जगण्याचा प्रयत्न करतो. दरवेळी जमतंच असं नाही. पण म्हणून प्रयत्न न करण्यात काही अर्थ नाही हेही कळून चुकलंय.
तसा दिवस गडबडीतच जातो. येणार्या क्षणाची वाट बघणं आणि गेलेल्या क्षणांचा हिशोब मांडणं या गडबडीत हातातला क्षण कसा निसटून जातो कळतच नाही. पण आपले सारे क्षण आपले कुठे असतात? सारं आयुष्यच देवाणघेवाण होवून बसलं आहे.
काही क्षण द्यायचे अन बदल्यात काही मिळवायचे. कधी कमी देउन जास्त मिळतं अन कधी खूप काही देउनसुद्धा झोळी रितीच रहाते.
एखाद्या शांत संध्याकाळी वाटतं, पडावं बाहेर या बिल्डिंगमधून. उपभोगावी ही संध्याकाळ. मावळत जाणार्या त्या सूर्याला करावं कॆद मुठीत. पकडून ठेवावा हा क्षण. आकाशातले हे अगणित रंग जणू पुन्हा कधी दिसणारच नाहीयेत. तो सूर्य मावळतो आहे तो पुन्हा न उगवण्यासाठीच.अन जर उगवलाच तो उद्या तर असेल अगदी उष्टावलेला अन या संध्याकाळच्या बेहोशीतच तो करेल उद्याची मार्गक्रमणा.
नेमक्या अशाच क्षणी जाणवतं की कर्तव्याची अद्रुष्य बंधनंच तोडायला जास्त अवघड असतात.
मग हुरहुरत त्या सूर्यास्ताकडे पहात रहातो. पहात राहतो पश्चिमेला रंगलेली मॆफ़ल आणि तिची भगव्या छ्टेच्या भॆरवीने होणारी सांगता. हळूहळू अंधार पडतो आणि मी कामाकडे वळतो.
प्रिय, परवा काय झालं माहितंय? मल्टिनॅशनल कंपनीच्या गेटबाहेरच्या चकचकीत रस्त्यावरच एक मरतुकडा बॆल मटकन खाली बसला होता. त्याचा हाडं हाडं दिसणारा गाडीवान त्याला चुचकारून उठवत होता. एवढ्यात पोट सुटलेला कंपनीचा वॉचमन आला आणि गाडीवानावर डाफ़रला. हो , नेमका त्याच वेळी एखादा अति-संवेदनशील (emotional fool म्हण हवं तर) अभियंता आला असता तर ’इंडिया शायनिंग’ वगॆरे त्याच्या भ्रमाला सुरूंग लागला असता. आधीच वाढत्या संधींमुळे अट्रीशन रेट वाढत चाललाय. त्यात असल्या ’फ़ालतू’ कारणामुळे एखादा अभियंता कंपनी सोडून गेला तर मग प्रोजेक्ट वेळेवर संपणार कसा?
अखेर गाडीवानानं चिडून बॆलाचं शेपूट पिरगाळलं.तरी तो उठेना. एवढ्यात मागे भलीमोठी इंपोर्टेड कार येउन उभी राहिली. ड्रायव्हर हॉर्न वाजवू लागला. हॉर्नचा आवाज,गार्डच्या शिव्या आणि कदाचित पोटातली भूक या सगळ्यामुळे संतापून गाडीवानाने बॆलाची पाठ सोलवटून काढली. अखेर बॆल उठला अन चालू लागला.
’लीड इंडिया’ वगॆरे कार्यक्रमात किंवा ’आज तक’ वर तो बॆल आणि गाडीवन दिसायला हवे होते. किमान पोटभर अन्न नाही तरी हजार एक एसेमेस तरी त्याच्या वाट्याला नक्कीच आले असते.
भरलेला कागद फ़क्त त्यावरच्या शब्दांचा होवून राहतो. त्याच्यावर उमटणा-या प्रत्येक अक्षराची माळ पडते त्याच्या गळ्यात. मग पातिव्रत्याचं भान राखत तो फ़क्त आणि फ़क्त लिहिलेल्या अक्षरांशीच संग करतो.
त्यातूनही असतात काही, जे अक्षरांची बंधनं तोडून थेट भिडतात वाचकाच्या ह्रुदयाला. दाखवतात त्याला लेखकाचे अपुरे शब्द आणि त्यामागच्या अधु-या भावना.
को-या कागदाने मात्र छातीत रोखून धरलेली असतात विचारांची वादळं, दु:खाचे कढ आणि प्रेमाची एखादी गुलाबी झुळूक. It just keeps us guessing. काय उतरेल या कागदावर? लिहिली जातील का याच्यावर क्रांतीगीते? की हळूवार उतरेल एखादं प्रेमाचं द्वंद्वगीत? की गिचमिड अक्षर आणि कळकट मनाने यावर ओकला जाईल काळ्याकुट्ट शाईतून एखादा अश्लील मजकूर?
कुणास ठावूक.
कधी एखाद्या अस्सल पंजाबी संपूर्णसिंह गुलजार च्या हाती आलेल्या को-या कागदावर ’तेरे बिना जिंदगीसे शिकवा’ उतरतं तर कधी एका कर्नाटकातल्या प्रोफ़ेसराने लिहिलेल्या कागदावरची ’स्वामी’ किंवा ’ऑर्फ़ियस’ आतून हलवते.
एखाद्या तासाला वहीच्या शेवटल्या पानावरल्या ४ ओळी किंवा परिक्षा चालू असताना प्रश्नपत्रिकेच्या मागे उद्वेगाने लिहिलेली कविता असो, त्या बेट्या कागदाचं भविष्य काही भाकता येत नाही.
आजकाल को-या कागदावरून नजर ह्टत नाही. लिहिण्यासारखं काही नसतं म्हणून नाही तर वाचण्यासारखं खूप काही सापडतं म्हणून....
स.न.वि.वि. सारं काही क्षेमकुशल ना? खरंतर हे पत्र मी कसा आहे हे सांगण्यासाठी लिहीत आहे. त्यामुळे याहून जास्त ऒपचारिक होता येणार नाही. क्षमस्व.
मी ठीक आहे. म्हणजे तसा बरा आहे. रोज न चुकता जगण्याचा प्रयत्न करतो. दरवेळी जमतंच असं नाही. पण म्हणून प्रयत्न न करण्यात काही अर्थ नाही हेही कळून चुकलंय.
तसा दिवस गडबडीतच जातो. येणार्या क्षणाची वाट बघणं आणि गेलेल्या क्षणांचा हिशोब मांडणं या गडबडीत हातातला क्षण कसा निसटून जातो कळतच नाही. पण आपले सारे क्षण आपले कुठे असतात? सारं आयुष्यच देवाणघेवाण होवून बसलं आहे.
काही क्षण द्यायचे अन बदल्यात काही मिळवायचे. कधी कमी देउन जास्त मिळतं अन कधी खूप काही देउनसुद्धा झोळी रितीच रहाते.
एखाद्या शांत संध्याकाळी वाटतं, पडावं बाहेर या बिल्डिंगमधून. उपभोगावी ही संध्याकाळ. मावळत जाणार्या त्या सूर्याला करावं कॆद मुठीत. पकडून ठेवावा हा क्षण. आकाशातले हे अगणित रंग जणू पुन्हा कधी दिसणारच नाहीयेत. तो सूर्य मावळतो आहे तो पुन्हा न उगवण्यासाठीच.अन जर उगवलाच तो उद्या तर असेल अगदी उष्टावलेला अन या संध्याकाळच्या बेहोशीतच तो करेल उद्याची मार्गक्रमणा.
नेमक्या अशाच क्षणी जाणवतं की कर्तव्याची अद्रुष्य बंधनंच तोडायला जास्त अवघड असतात.
मग हुरहुरत त्या सूर्यास्ताकडे पहात रहातो. पहात राहतो पश्चिमेला रंगलेली मॆफ़ल आणि तिची भगव्या छ्टेच्या भॆरवीने होणारी सांगता. हळूहळू अंधार पडतो आणि मी कामाकडे वळतो.
प्रिय, परवा काय झालं माहितंय? मल्टिनॅशनल कंपनीच्या गेटबाहेरच्या चकचकीत रस्त्यावरच एक मरतुकडा बॆल मटकन खाली बसला होता. त्याचा हाडं हाडं दिसणारा गाडीवान त्याला चुचकारून उठवत होता. एवढ्यात पोट सुटलेला कंपनीचा वॉचमन आला आणि गाडीवानावर डाफ़रला. हो , नेमका त्याच वेळी एखादा अति-संवेदनशील (emotional fool म्हण हवं तर) अभियंता आला असता तर ’इंडिया शायनिंग’ वगॆरे त्याच्या भ्रमाला सुरूंग लागला असता. आधीच वाढत्या संधींमुळे अट्रीशन रेट वाढत चाललाय. त्यात असल्या ’फ़ालतू’ कारणामुळे एखादा अभियंता कंपनी सोडून गेला तर मग प्रोजेक्ट वेळेवर संपणार कसा?
अखेर गाडीवानानं चिडून बॆलाचं शेपूट पिरगाळलं.तरी तो उठेना. एवढ्यात मागे भलीमोठी इंपोर्टेड कार येउन उभी राहिली. ड्रायव्हर हॉर्न वाजवू लागला. हॉर्नचा आवाज,गार्डच्या शिव्या आणि कदाचित पोटातली भूक या सगळ्यामुळे संतापून गाडीवानाने बॆलाची पाठ सोलवटून काढली. अखेर बॆल उठला अन चालू लागला.
’लीड इंडिया’ वगॆरे कार्यक्रमात किंवा ’आज तक’ वर तो बॆल आणि गाडीवन दिसायला हवे होते. किमान पोटभर अन्न नाही तरी हजार एक एसेमेस तरी त्याच्या वाट्याला नक्कीच आले असते.
Comments