मी आत्तापर्यंत बर्याच लग्नांना हजेरी लावलेली आहे आणि जवळपास प्रत्येक लग्नात एक गोष्ट नेहमीच notice केलीये. म्हणजे बघा नात्यातल्या कुणाचं लग्न नसेल तर आपण शक्यतो मंगलाष्टकं पडायच्या थोडं आधी कार्यालयात पोचतो. दाराजवळचं टेबल तोवर रिकामं झालेलं असतं. (टेबलापाशी उभं राहुन येणार्यांचं सुहास्य वदनानं स्वागत करणार्या ललनांनी आधीच आत प्रयाण केलेलं असतं.) टेबलावर फ़क्त अक्षतांचं ताट असतं. चेतक सुपारी, गुलाबाची फ़ुलं आणि पेढ्यांचे chocolates संपलेले असतात. अत्तराचा फ़वारा करणारा fan पण बंद झालेला असतो. आपण मुठीत बचकभर अक्षता घेउन आतल्या गर्दित घुसतो. बरीचशी लग्नं उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात असल्यानं कपडे ओले झालेले असतातच.
एवढ्या सगळ्या प्रयासानंतर आपण गर्दित उभे रहातो. वर आणि वधु एवढ्या गर्दितून दिसतच नाहीत. मग भटजी हातात माईक घेउन मंगलाक्षता सुरू करतात. अत्यंत भसाड्या आणि मोठ्या आवाजात. अशा वेळी काही "अनुभवी" मंडळींना जोर चढतो. "सावधान" येण्याआधीच ते अक्षता टाकु लागतात. मग आपणही टाकतो. मागुन कुठुनतरी घामाने भरलेल्या मानेवर सटासट अक्षता बसत असतात. हे असं दोन मिनिटं चालतं. आपण अंदाज घेउन अक्षता टाकत असतो. उगाच "शुभमुहुर्तो सावधान" च्या वेळी अक्षता संपल्याने बावळटासारखं हात बांधुन उभं रहावं लागु नये म्हणुन! पण कसचं काय. ज्यांची कुठलीही कविता कधी रविवारच्या पुरवणीत सुद्धा छापली गेलेली नाही अशा कुठल्यातरी काकु किंवा मामींना जोर चढतो. भटजींच्या हातुन माईक हिसकावुन घेउन त्या गायला लागतात. आहाहा ! काय तो आवाज, काय ते शब्द ! नुसतं र ला र, ट ला ट.
बाळाची आई मायाळू , बापही कनवाळू.
नव्या सुनेला ओवाळू , प्रेमाने !
च्यायला ईथे उकडून जीव जात असतो आणि काकु सूड उगवत असतात. न चढणार्या,चिरक्या आवाजात गाऊन. भटजी जरा रागावलेले असतात , त्यांच्यावरचा हक्काचा प्रकाशझोत हिरावला गेल्याने. अखेर पत्रिकेत दिलेल्या मुहुर्ताच्या बरोबर १७ मिनिटांनंतर भटजींच्या हातात पुन्हा माईक येतो. शेवटलं कडवं झालं की आपण उरल्या सुरल्या अक्षता टाकुन आधीच बघुन ठेवलेल्या जेवणविभागाकडे धाव घेतो. थोड्याफ़ार फ़रकाने सगळ्या लग्नांची कहाणी अशीच सुफ़ळ संपूर्ण होते.
असाच सार्वजनिक ठिकाणी कलागुणप्रदर्शनाचा दुसरा नमुना म्हणजे मंदिरातल्या आरत्या! त्यातल्या त्यात मारूतीच्या मंदिरात आरती चालु असली तर रांगेत पुढे उभे राहुन गाणार्यांच्या अंगात साक्षात महारूद्र हनुमानच संचारले आहेत असं वाटतं. घंटा किणकिण नागरा म्हणताना यांचा आवाज किणकिणत तर नाहीच पण घंटेसारखा डोक्यात ठणठणत असतो. एकदा चुकुन मी आरतीच्या वेळेत मारूतीच्या मंदिरात जाण्याचा आणी देवाचं दर्शन घेण्याचा प्रमाद केला. त्या हनुमंताच्या भक्तजनांनी माझ्याकडे असे काही जळजळीत कटाक्ष टाकले की मी घाबरून काढता पायच घेतला.
एकदा गणपतीबाप्पाच्या मंदिरात गेलो होतो. दर्शन घेतलं. शहाण्या बाळासारख्या प्रदक्षिणा घालायला सुरवात केली. मंदिरात फ़क्त एक आज्जी होती. तिच्या चेहर्यावरुन संत्रस्त झालेली दिसत होती. मी आपला अथर्वशिर्ष म्हणत आपल्याच नादात प्रदक्षिणा घालत होतो. ५वी प्रदक्षिणा सुरू होणार ईतक्यात आज्जी वसकन अंगावर आली. "ए बाबा आधी प्रसाद घे. प्रदक्षिणा नंतर घालत बस." मी मुकाट्याने प्रसाद घेतला. अथर्वशिर्षाचं कडवं तर तोपर्यंत विसरलोच होतो. तो प्रसाद हातात धरून परत पहिल्यापासून स्तोत्र म्हणत माझ्या प्रदक्षिणा सुरू झाल्या. हात चिकट. जोडताही येईनात. अखेर तसाच देवाला दंडवत घालून बाहेर पडलो.
आजकाल मंदिर रिकामं असल्याशिवाय मी शक्यतो आत जाण्याचं धाडस करत नाही. न जाणो कुठुन आज्ज्या येतील आणि.......
एवढ्या सगळ्या प्रयासानंतर आपण गर्दित उभे रहातो. वर आणि वधु एवढ्या गर्दितून दिसतच नाहीत. मग भटजी हातात माईक घेउन मंगलाक्षता सुरू करतात. अत्यंत भसाड्या आणि मोठ्या आवाजात. अशा वेळी काही "अनुभवी" मंडळींना जोर चढतो. "सावधान" येण्याआधीच ते अक्षता टाकु लागतात. मग आपणही टाकतो. मागुन कुठुनतरी घामाने भरलेल्या मानेवर सटासट अक्षता बसत असतात. हे असं दोन मिनिटं चालतं. आपण अंदाज घेउन अक्षता टाकत असतो. उगाच "शुभमुहुर्तो सावधान" च्या वेळी अक्षता संपल्याने बावळटासारखं हात बांधुन उभं रहावं लागु नये म्हणुन! पण कसचं काय. ज्यांची कुठलीही कविता कधी रविवारच्या पुरवणीत सुद्धा छापली गेलेली नाही अशा कुठल्यातरी काकु किंवा मामींना जोर चढतो. भटजींच्या हातुन माईक हिसकावुन घेउन त्या गायला लागतात. आहाहा ! काय तो आवाज, काय ते शब्द ! नुसतं र ला र, ट ला ट.
बाळाची आई मायाळू , बापही कनवाळू.
नव्या सुनेला ओवाळू , प्रेमाने !
च्यायला ईथे उकडून जीव जात असतो आणि काकु सूड उगवत असतात. न चढणार्या,चिरक्या आवाजात गाऊन. भटजी जरा रागावलेले असतात , त्यांच्यावरचा हक्काचा प्रकाशझोत हिरावला गेल्याने. अखेर पत्रिकेत दिलेल्या मुहुर्ताच्या बरोबर १७ मिनिटांनंतर भटजींच्या हातात पुन्हा माईक येतो. शेवटलं कडवं झालं की आपण उरल्या सुरल्या अक्षता टाकुन आधीच बघुन ठेवलेल्या जेवणविभागाकडे धाव घेतो. थोड्याफ़ार फ़रकाने सगळ्या लग्नांची कहाणी अशीच सुफ़ळ संपूर्ण होते.
असाच सार्वजनिक ठिकाणी कलागुणप्रदर्शनाचा दुसरा नमुना म्हणजे मंदिरातल्या आरत्या! त्यातल्या त्यात मारूतीच्या मंदिरात आरती चालु असली तर रांगेत पुढे उभे राहुन गाणार्यांच्या अंगात साक्षात महारूद्र हनुमानच संचारले आहेत असं वाटतं. घंटा किणकिण नागरा म्हणताना यांचा आवाज किणकिणत तर नाहीच पण घंटेसारखा डोक्यात ठणठणत असतो. एकदा चुकुन मी आरतीच्या वेळेत मारूतीच्या मंदिरात जाण्याचा आणी देवाचं दर्शन घेण्याचा प्रमाद केला. त्या हनुमंताच्या भक्तजनांनी माझ्याकडे असे काही जळजळीत कटाक्ष टाकले की मी घाबरून काढता पायच घेतला.
एकदा गणपतीबाप्पाच्या मंदिरात गेलो होतो. दर्शन घेतलं. शहाण्या बाळासारख्या प्रदक्षिणा घालायला सुरवात केली. मंदिरात फ़क्त एक आज्जी होती. तिच्या चेहर्यावरुन संत्रस्त झालेली दिसत होती. मी आपला अथर्वशिर्ष म्हणत आपल्याच नादात प्रदक्षिणा घालत होतो. ५वी प्रदक्षिणा सुरू होणार ईतक्यात आज्जी वसकन अंगावर आली. "ए बाबा आधी प्रसाद घे. प्रदक्षिणा नंतर घालत बस." मी मुकाट्याने प्रसाद घेतला. अथर्वशिर्षाचं कडवं तर तोपर्यंत विसरलोच होतो. तो प्रसाद हातात धरून परत पहिल्यापासून स्तोत्र म्हणत माझ्या प्रदक्षिणा सुरू झाल्या. हात चिकट. जोडताही येईनात. अखेर तसाच देवाला दंडवत घालून बाहेर पडलो.
आजकाल मंदिर रिकामं असल्याशिवाय मी शक्यतो आत जाण्याचं धाडस करत नाही. न जाणो कुठुन आज्ज्या येतील आणि.......
Comments