उकाडा. रात्रीची वेळ. अंगावर घोंघावत येणारी डास,चिलटं. आजुबाजूला महतप्रयासाने दबलेला कोलाहल. जणू होता होता राहिलेला विस्फ़ोट.
"काय कटकट आहे!", तो न जाणे कितव्यांदा स्वत:शीच पुटपुटला.हे नेहमीचंच आहे. असल्या वेळा त्याच्या अंगावर धावून येतात. त्याचं स्वामित्व काही क्षणांपुरतं का होईना,पण झुगारून देऊन भूतकाळ समोर उभा रहातो. मग सुरु होतो नेहमीचाच खेळ. गतकाळातले निर्णायक क्षण समोर उभे ठाकतात. मग पर्यायांचा विचार त्याला फ़रफ़टत नेतो. तेवढा वेळ तो कोणीतरी वेगळाच असतो.
एखाद्या माणसाबद्दल विचार करणं आणि तो आपल्याबद्दल काय विचार करत असेल याचे आराखाडे बांधणं हा त्याचा फ़ावल्या वेळातला खेळ. दुसर्याच्या मनात शिरून त्याचं सुख आणि दु:ख अनुभवायचा प्रयत्न करायचा. उद्देश एकच. मी इतरांपेक्षा सुखी असो वा दु:खी , मी 'वेगळा' आहे ही सुखद जाणीव. भूतकाळाने ओरबाडल्यानंतर झालेल्या जखमांतून जणू त्याचा वेगळेपणाचा आनंद झिरपत असतो.
रात्र वाढत असते. वर्तमानापासून दूर, हव्याशा वाटणार्या भविष्यात त्याच्या भरार्या चालू असतात.
शेजारची माणसं आणि अंगावर बसणारे किडे यांतला फ़रक बघता बघता नाहीसा होतो. माणूस शेवटी किडाच. जन्माला येतो, टिचभर पोट जे कधी भरतच नाही ते भरण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत असतो. आयुष्यातली सुखं दु:खं त्यात्या वेळी किती मोठी वाटतात. पण अशा क्षणी त्यांच्यात अडकलेला भावनांचा गुंता बाजूला काढला की उरतो तो फ़क्त क्षणांचा हिशोब!. "बापरे, आजकाल फ़ारच विचार करतोय मी". स्वत:ला वर्तमानात आणण्याच्या त्याच्या या चालीची त्याच्या मनाला आता चांगलीच सवय झालेली असते. ते दाद लागू देत नाही.
इतक्यात दूर कुठेतरी म.रा.वि.मं. चा कुणीतरी कर्मचारी कुठला तरी खटका दाबतो. सहस्त्रसूर्यांच्या तेजाने सगळं शहर उजळून निघतं. खुंटा घालून अडकवलेलं जीवनाचं रहाटगाडगं पुन्हा सुरू झालेलं असतं.
बाळबोध संस्कारांमुळे दिव्याकडे बघत त्याचे हात आपोआप जोडले जातात. मनातली सगळी जळमटं झटकत तोही पुटपुटतो, 'शुभंकरोती कल्याणम.......'.
"काय कटकट आहे!", तो न जाणे कितव्यांदा स्वत:शीच पुटपुटला.हे नेहमीचंच आहे. असल्या वेळा त्याच्या अंगावर धावून येतात. त्याचं स्वामित्व काही क्षणांपुरतं का होईना,पण झुगारून देऊन भूतकाळ समोर उभा रहातो. मग सुरु होतो नेहमीचाच खेळ. गतकाळातले निर्णायक क्षण समोर उभे ठाकतात. मग पर्यायांचा विचार त्याला फ़रफ़टत नेतो. तेवढा वेळ तो कोणीतरी वेगळाच असतो.
एखाद्या माणसाबद्दल विचार करणं आणि तो आपल्याबद्दल काय विचार करत असेल याचे आराखाडे बांधणं हा त्याचा फ़ावल्या वेळातला खेळ. दुसर्याच्या मनात शिरून त्याचं सुख आणि दु:ख अनुभवायचा प्रयत्न करायचा. उद्देश एकच. मी इतरांपेक्षा सुखी असो वा दु:खी , मी 'वेगळा' आहे ही सुखद जाणीव. भूतकाळाने ओरबाडल्यानंतर झालेल्या जखमांतून जणू त्याचा वेगळेपणाचा आनंद झिरपत असतो.
रात्र वाढत असते. वर्तमानापासून दूर, हव्याशा वाटणार्या भविष्यात त्याच्या भरार्या चालू असतात.
शेजारची माणसं आणि अंगावर बसणारे किडे यांतला फ़रक बघता बघता नाहीसा होतो. माणूस शेवटी किडाच. जन्माला येतो, टिचभर पोट जे कधी भरतच नाही ते भरण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत असतो. आयुष्यातली सुखं दु:खं त्यात्या वेळी किती मोठी वाटतात. पण अशा क्षणी त्यांच्यात अडकलेला भावनांचा गुंता बाजूला काढला की उरतो तो फ़क्त क्षणांचा हिशोब!. "बापरे, आजकाल फ़ारच विचार करतोय मी". स्वत:ला वर्तमानात आणण्याच्या त्याच्या या चालीची त्याच्या मनाला आता चांगलीच सवय झालेली असते. ते दाद लागू देत नाही.
इतक्यात दूर कुठेतरी म.रा.वि.मं. चा कुणीतरी कर्मचारी कुठला तरी खटका दाबतो. सहस्त्रसूर्यांच्या तेजाने सगळं शहर उजळून निघतं. खुंटा घालून अडकवलेलं जीवनाचं रहाटगाडगं पुन्हा सुरू झालेलं असतं.
बाळबोध संस्कारांमुळे दिव्याकडे बघत त्याचे हात आपोआप जोडले जातात. मनातली सगळी जळमटं झटकत तोही पुटपुटतो, 'शुभंकरोती कल्याणम.......'.
Comments