शाळेत असताना मित्र, माझा मित्र, आवडता मित्र , जिवलग मित्र असल्या बर्याच विषयांवर निबंध लिहिलेत. मराठी माध्यम असल्याकारणाने my best friend या शिर्षकाखाली विंग्रजीतही अक्कल पाजळली. अर्थात a friend in need... वगॆरे लिहायला ठीक आहे. पण वास्तविक आयुष्यात पुस्तकी व्याख्येत बसणारा मित्र मिळणं फ़ार अवघड. पण जेव्हा कळतं की मॆत्री ही असल्या कुचकामी व्याख्यांच्या पलिकडली गोष्ट आहे तेव्हा मात्र गंमत वाटते आणि मग आपण खुलेपणाने आपल्या मित्रपरिवाराकडे बघतो. काही नव्या कसोट्या वापरून. जशा की ... जुने अनुभव, अंतरीची गाठ , सहवासातला मोकळेपणा.. वगॆरे वगॆरे.
मला मित्र बरेच आहेत. त्यात आणि hostelite असल्यानं गेली साडे तीन वर्षं मी मित्रांच्या गराड्यातच आहे. दिवसाचे चोवीस तास मित्रांचाच सहवास. शाळेत असताना मित्र नव्हते अशातला भाग नाही. पण त्यातल्या बहुतांश मित्रांशी नाड जुळलीच नाही. आम्ही सगळेच लहान होतो किंवा मी आताइतका प्रगल्भ नव्हतो किंवा वयापेक्षा जास्तच शहाणा होतो.. कारण काहीही असू शकेल. पण मित्रांवरचे निबंध लिहिताना काहीतरी खोटं,क्रुत्रिम लिहितोय असं नक्कीच वाटायचं. त्यावेळचे मित्रही छान होतेच. आजही माझी त्यांच्याशी मॆत्री टिकून आहे. .but still something was missing.
सुदॆवाने पुण्यात आल्यानंतर बरेच नविन मित्र भेटले , काही जुन्या शाळकरी मित्रांची नव्याने ओळख झाली. त्यामुळेच तर हा मित्रांवरचा लेख लिहिताना आज फ़क्त छानच वाटतंय. मनात दुसरी कुठलीच भावना नाहीये. गेलं एक वर्ष तर मैत्रीखात्याच्या द्रुष्टीने भरभराटीचं ठरलं. मित्रांची फ़ार वेगळी रूपं फ़ार जवळून बघण्याचा (/वाचण्याचा / ऎकण्याचा ) योग आला. वरच्या कसोट्यांमधे खरे उतरणारे बहुतांश मित्र पुण्यातले आहेत. काहींशी तर गेल्या दीड वर्षातलीच ओळख आहे. पण आज मात्र नवल वाटतं की मी इतकी वर्षं या लोकांशिवाय कशी काढली? बरं आता चांगले मित्र तर मिळाले. मग यातला सर्वात चांगला मित्र कोणता? नाही नाही. चांगले तर सगळेच आहेत. जवळचाही म्हणता येणार नाही . फ़क्त कॊटुंबिक आणि शॆक्षणिक पार्श्वभूमी माहित असली म्हणजे मित्रोत्तम झाला असं थोडीच असतं? अर्थात आज असे बरेच मित्र आहेत म्हणून मी हे करू शकतो. अन्यथा मित्रनिवडीचा प्रपंच करण्याची गरजच काय पडली असती?
जरा निरखून बघितलं तर या गर्दित एक मित्र उठून दिसतो. याच्याशी ओळख म्हणली तर चार वर्षापूर्वीची. पण याचं खरं स्वरूप उलगडलं ते गेल्या वर्षी. त्याच्याशी कित्येक तास मारलेल्या अर्थक आणी निरर्थक गप्पांनंतर उलगडलं की आपण मित्र या प्राण्याकडुन ज्या काही अपेक्षा करत होतो त्यातल्या बहुतांश अपेक्षांची पूर्ती इथे होतेय. पण माझं बाळबोध मन त्याला माझा सर्वात जिवलग मित्र अशी माझ्या द्रुष्टीने महत्त्वाची पदवी द्यायला तयार नाहीये. कारण क्षुल्लक आहे. मी कदाचित त्याचा सर्वात चांगला, जवळचा मित्र नाहीये. चार वर्षांपूर्वी ही गोष्ट मला अपमानकारक वाटली असती. मी फ़क्त या कारणास्तव त्याच्याशी मनासारखं बोलू शकलो नसतो. पण आता कळून चुकलंय की मित्राला तो आहे तसं स्विकारणं हीच तर मॆत्रीची खरी कसोटी नाही का? आणि मॆत्रीत अटी कसल्या घालायच्या? तो माझा सर्वात चांगला मित्र आहे ही बाब आज माझ्यासाठी पुरेशी आहे. माझं त्याच्या आयुष्यातलं स्थान काय आहे याने मला आज फ़ारसा फ़रक पडत नाही. त्याचं मात्र माझ्या आयुष्यातलं स्थान वेगळंच आहे.
तो हुषार आहे, लोक त्याला वेडा म्हणतात. तो स्मार्ट आहे , लोक त्याला गबाळा म्हणतात. तो खूप वाचतो, लोक त्याला रिकामटेकडे धंदे म्हणतात. तो विचार करून बोलतो, लोक म्हणतात "तो ना? काहीही बरळत असतो". तो मनातलं तोंडावर बोलतो, लोक त्याला फ़टकळ,बेअक्कल म्हणतात. त्याची लेव्हल कळायला मला चार वर्ष लागली,बाकीच्यांचं सोडाच. त्याच्या घरच्यांनी त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं त्याच्या लहानपणीच बंद केलं. आम्ही मनातल्या मनात पुण्यात चार वर्षांनी फ़्ल्याट घेतला तर किती हप्ता पडेल याची गणितं करत असतो आणी हा मात्र जाहीर करतो "मी दहा वर्षानी millionaire होणार आहे." तो जितक्या उत्कटतेने english movies बघतो तितक्याच उत्कटतेने वेदांतही वाचतो. त्याला आयुष्याचा अर्थ शोधायचाय. तोही लवकर. वेळ नाहीये त्याच्याकडे. धोपटमार्ग झुगारायची त्याची धडपड मी स्वत: बघितली आहे. त्याच्या निम्म्याहून अधिक मित्रांना तो काय चीज आहे हे अजूनही कळलेलं नाहीये. तो परफ़ेक्ट नाहीये. पण परफ़ेक्ट होण्याची इतकी प्रबळ ईच्छा फ़ार कमी जणांकडे असते हे नक्की. मला त्याच्या सगळ्याच गोष्टी पटतात असं नाही. काहीवेळा मला त्याचा रागही आला आहे, मी त्याच्या नावाने ईतरांकडे खडेही फ़ोडले आहेत. त्याला माझी सगळी माहिती आहे , तो माझ्या नेहमी मदतीला धावून येतो , आम्ही रोज संपर्कात असतो , त्याच्या आयुष्यात काय चालू आहे हे तो मला नियमितपणे सांगतो.... यातलं काही एक घडत नाही. थोडक्यात यातलं काहीच बेस्ट फ़्रेंड च्या व्याख्येत बसणारं नाहीये. तरीही......
परवा त्याच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवली. तो कदाचित दहा वर्षात millionaire होईलही. पण मला मात्र आजच त्याच्या मॆत्रीने श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय.
मला मित्र बरेच आहेत. त्यात आणि hostelite असल्यानं गेली साडे तीन वर्षं मी मित्रांच्या गराड्यातच आहे. दिवसाचे चोवीस तास मित्रांचाच सहवास. शाळेत असताना मित्र नव्हते अशातला भाग नाही. पण त्यातल्या बहुतांश मित्रांशी नाड जुळलीच नाही. आम्ही सगळेच लहान होतो किंवा मी आताइतका प्रगल्भ नव्हतो किंवा वयापेक्षा जास्तच शहाणा होतो.. कारण काहीही असू शकेल. पण मित्रांवरचे निबंध लिहिताना काहीतरी खोटं,क्रुत्रिम लिहितोय असं नक्कीच वाटायचं. त्यावेळचे मित्रही छान होतेच. आजही माझी त्यांच्याशी मॆत्री टिकून आहे. .but still something was missing.
सुदॆवाने पुण्यात आल्यानंतर बरेच नविन मित्र भेटले , काही जुन्या शाळकरी मित्रांची नव्याने ओळख झाली. त्यामुळेच तर हा मित्रांवरचा लेख लिहिताना आज फ़क्त छानच वाटतंय. मनात दुसरी कुठलीच भावना नाहीये. गेलं एक वर्ष तर मैत्रीखात्याच्या द्रुष्टीने भरभराटीचं ठरलं. मित्रांची फ़ार वेगळी रूपं फ़ार जवळून बघण्याचा (/वाचण्याचा / ऎकण्याचा ) योग आला. वरच्या कसोट्यांमधे खरे उतरणारे बहुतांश मित्र पुण्यातले आहेत. काहींशी तर गेल्या दीड वर्षातलीच ओळख आहे. पण आज मात्र नवल वाटतं की मी इतकी वर्षं या लोकांशिवाय कशी काढली? बरं आता चांगले मित्र तर मिळाले. मग यातला सर्वात चांगला मित्र कोणता? नाही नाही. चांगले तर सगळेच आहेत. जवळचाही म्हणता येणार नाही . फ़क्त कॊटुंबिक आणि शॆक्षणिक पार्श्वभूमी माहित असली म्हणजे मित्रोत्तम झाला असं थोडीच असतं? अर्थात आज असे बरेच मित्र आहेत म्हणून मी हे करू शकतो. अन्यथा मित्रनिवडीचा प्रपंच करण्याची गरजच काय पडली असती?
जरा निरखून बघितलं तर या गर्दित एक मित्र उठून दिसतो. याच्याशी ओळख म्हणली तर चार वर्षापूर्वीची. पण याचं खरं स्वरूप उलगडलं ते गेल्या वर्षी. त्याच्याशी कित्येक तास मारलेल्या अर्थक आणी निरर्थक गप्पांनंतर उलगडलं की आपण मित्र या प्राण्याकडुन ज्या काही अपेक्षा करत होतो त्यातल्या बहुतांश अपेक्षांची पूर्ती इथे होतेय. पण माझं बाळबोध मन त्याला माझा सर्वात जिवलग मित्र अशी माझ्या द्रुष्टीने महत्त्वाची पदवी द्यायला तयार नाहीये. कारण क्षुल्लक आहे. मी कदाचित त्याचा सर्वात चांगला, जवळचा मित्र नाहीये. चार वर्षांपूर्वी ही गोष्ट मला अपमानकारक वाटली असती. मी फ़क्त या कारणास्तव त्याच्याशी मनासारखं बोलू शकलो नसतो. पण आता कळून चुकलंय की मित्राला तो आहे तसं स्विकारणं हीच तर मॆत्रीची खरी कसोटी नाही का? आणि मॆत्रीत अटी कसल्या घालायच्या? तो माझा सर्वात चांगला मित्र आहे ही बाब आज माझ्यासाठी पुरेशी आहे. माझं त्याच्या आयुष्यातलं स्थान काय आहे याने मला आज फ़ारसा फ़रक पडत नाही. त्याचं मात्र माझ्या आयुष्यातलं स्थान वेगळंच आहे.
तो हुषार आहे, लोक त्याला वेडा म्हणतात. तो स्मार्ट आहे , लोक त्याला गबाळा म्हणतात. तो खूप वाचतो, लोक त्याला रिकामटेकडे धंदे म्हणतात. तो विचार करून बोलतो, लोक म्हणतात "तो ना? काहीही बरळत असतो". तो मनातलं तोंडावर बोलतो, लोक त्याला फ़टकळ,बेअक्कल म्हणतात. त्याची लेव्हल कळायला मला चार वर्ष लागली,बाकीच्यांचं सोडाच. त्याच्या घरच्यांनी त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं त्याच्या लहानपणीच बंद केलं. आम्ही मनातल्या मनात पुण्यात चार वर्षांनी फ़्ल्याट घेतला तर किती हप्ता पडेल याची गणितं करत असतो आणी हा मात्र जाहीर करतो "मी दहा वर्षानी millionaire होणार आहे." तो जितक्या उत्कटतेने english movies बघतो तितक्याच उत्कटतेने वेदांतही वाचतो. त्याला आयुष्याचा अर्थ शोधायचाय. तोही लवकर. वेळ नाहीये त्याच्याकडे. धोपटमार्ग झुगारायची त्याची धडपड मी स्वत: बघितली आहे. त्याच्या निम्म्याहून अधिक मित्रांना तो काय चीज आहे हे अजूनही कळलेलं नाहीये. तो परफ़ेक्ट नाहीये. पण परफ़ेक्ट होण्याची इतकी प्रबळ ईच्छा फ़ार कमी जणांकडे असते हे नक्की. मला त्याच्या सगळ्याच गोष्टी पटतात असं नाही. काहीवेळा मला त्याचा रागही आला आहे, मी त्याच्या नावाने ईतरांकडे खडेही फ़ोडले आहेत. त्याला माझी सगळी माहिती आहे , तो माझ्या नेहमी मदतीला धावून येतो , आम्ही रोज संपर्कात असतो , त्याच्या आयुष्यात काय चालू आहे हे तो मला नियमितपणे सांगतो.... यातलं काही एक घडत नाही. थोडक्यात यातलं काहीच बेस्ट फ़्रेंड च्या व्याख्येत बसणारं नाहीये. तरीही......
परवा त्याच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवली. तो कदाचित दहा वर्षात millionaire होईलही. पण मला मात्र आजच त्याच्या मॆत्रीने श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय.
Comments